लागले मन परतीच्या वाटेवरती
व्याकूळ डोळे आता मागती भेट तुझी ओझरती.
वळीव वेडा आठवणींचा रोज आताशा भिजवून जातो
अर्ध्या रात्री अवचित गात्री स्पर्श तुझे मोहरती.
नको थांबू पैलतीरावर पुन्हा मांडू ये डाव पटावर
पुन्हा सावरू जरी बहरले अडसर अवतीभवती.
चुकले कधी कुठे कुणाचे या साऱ्याचे नको खुलासे
जखमांवरल्या खपल्या सावध निमित्त शोधत फिरती.
विरहाच्या वणव्यात जळाले तुझ्या नि माझ्या मधले कुंपण
आणि जळाले माझे मी पण शरण तुला मी पुरती.
#काव्यादिंडी दिवस तिसरा आणि तिसरी कविता
वरील रचना हि गुरु ठाकूर यांची असून कौशल इनामदार यांनी संगीतबद्ध केलिये.
हे दोन जादुगार आपल्याला व्यवस्थित परिचयाचे आहेत. म्हणूनच, दोघांबद्दल अजून काही लिहायला नको.
बघा आवडतेय का ?
No comments:
Post a Comment